“महाराष्ट्र निवडणुकीत फिक्सिंग”, राहुल गांधींच्या आरोपांना आयोगाचं 4 पॉइंट्समध्ये सणसणीत उत्तर

“महाराष्ट्र निवडणुकीत फिक्सिंग”, राहुल गांधींच्या आरोपांना आयोगाचं 4 पॉइंट्समध्ये सणसणीत उत्तर

ECI on Rahul Gandhi Remarks : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. थेट निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शिंतोडे उडवण्यात येत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगानेही (Election Commission) या आरोपांना उत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांनी केलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. सामना हरल्यानंतर रेफरीला (सामनाधिकारी) दोष देण्याची एक नवी आणि असंगत पद्धत तयार झाली आहे, असा टोला आयोगाने राहुल गांधींना लगावला आहे.

राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचा आरोप भाजपवर केला होता. भाजपाची निवडणूक आयोगाशी मिलीभगत असून मतदानाचा टक्का वाढवण्यात आला होता असा आरोप केला. या वर्षाच्या अखेरीस बिहार राज्यात होणाऱ्या निवडणुकीतही असाच पॅटर्न राबवला जाऊ शकतो असा इशाराही राहुल गांधी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये दिला होता.

धक्कादायक! टरबूजांतून कोट्यावधींची गांजा तस्करी; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

या आरोपांसोबत राहुल गांधींनी एका वर्तमानपत्रातील त्यांचा लेखही शेअर केला. यात त्यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीतील गैरव्यवहारांचा उल्लेख केला होता. सन 2024 मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत महायुतीने 288 पैकी 235 जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. एकट्या भाजपानेच यातील 132 जागा जिंकल्या.

दरम्यान, राहुल गांधींनी केलेले आरोप तथ्यहीन असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. राहुल गांधी तथ्यांकडे वारंवार दुर्लक्ष करत आहेत. या प्रकारचे आरोपांमुळे पक्षाकडून नियुक्त केलेल्या हजारो प्रतिनिधींच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित होतो. चुकीचे आरोप करूनन निवडणूक आयोगाची बदनामी करण्याचा प्रयत्न अत्यंत तथ्यहीन आहे.

मतदानाच्या शेवटच्या दोन तासांत 65 लाख मते पडल्याचा दावा राहुल गांधींनी याआधीही केला होता. त्यावर असे घडणे केवळ अशक्य असल्याचे आयोगाने स्पष्ट केले होते. आयोगाने त्याच वेळी सांगितले होते की सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 6,40,87,588 मतदार मतदान केंद्रांवर पोहोचले आणि त्यांनी मतदान केले. प्रति तास सरासरी 58 लाख मतदान राज्यात होत होते. या हिशोबाने शेवटच्या दोन तासांत जवळपास 116 लाख मतदारांनी मतदान करणं केवळ अशक्य असल्याचं आयोगाने स्पष्ट केलं होतं.

प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवार, राजकीय पक्षांचे पोलिंग एजंट यांच्यासमोर मतदान झालं होतं. कांग्रेसचे उमेदवार किंवा त्यांच्या अधिकृत एजंट लोकांनी दुसऱ्या दिवशी रिटर्निंग ऑफीसर (RO) आणि निवडणूक पर्यवेक्षकांच्या समोर कोणताही आरोप केला नव्हता असेही निवडणूक आयोगाने (Election Commission of India) उत्तरात स्पष्ट केलं आहे.

भरधाव ट्रकची धडक! तेजस्वी यादव यांचा भीषण अपघात, 3 सुरक्षा कर्मचारी जखमी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube